रमाकाकुंनी त्यांच्या चाळीतल्या घराचे दुरुस्तीचे काम सुरू केले होते त्यामुळे त्यांची धावपळ होत होती. ते पाहून त्यांचा मुलगा सुमेध त्यांना म्हणाला,” आई इथे अगदी एशो आराम असतानाही तुझा जीव मात्र त्या दहा बाय दहाच्या खोलीत गुंतला आहे.विकून टाक आता ते घर.”
ते ऐकून काकूंच्या डोळ्यांत लगेच अश्रु तरळले. त्या सुमेधला म्हणाल्या ,” तुझ्यासाठी ती दहा बाय दहाची खोली असेल पण माझ्यासाठी आठवणींचा खजिना आहे. एक एक रुपया जोडला आम्ही. अनेक सुख दुःखाचे क्षणाचं साक्षीदार आहे ते घर. त्या घरामुळेच आज हे सोन्याचे दिवस बघतोय आपण.आणि तुझ्या बाबांची शेवटची आठवण आहे ते घर “
आपण हे बोलून आईच्या भावना दुखावल्याची सुमेधला जाणीव झाली,त्याने लगेच काकूंनी माफी मागितली.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


