लग्न झाले आणि नवरा नावाचे पात्र आले माझ्या आयुष्यात,
त्यांच्या येण्याने जाणवले, नक्की कसली उणीव होती माझ्या या प्रवासात.
मी स्वच्छंदी, तो अगदी जबाबदरीने वागणारा.
मी थोडी चिडकी, तो सर्व परिस्थिती शांतपणे हाताळणारा.
मी थोडी अस्ताव्यस्त, तो अगदी नीटनेटकेपणे जगणारा.
मी थोडीशी वेंधळी ,तो जपून पावलं टाकणारा.
कधी मला हसवणारा, कधी माझ्या सोबत हसणारा.
कधी मला समजवणारा, तर कधी वादविवाद करणारा.
मी कठोर आहे, मला तितका फरक पडत नाही असा अविर्भाव आणणारा.
माझ्याही नकळत माझ्या आवडीनिवडी जपणारा, काळजी घेणारा.
घरातल्या प्रत्येक गोष्टीत, निर्णयात माझी साथ देणारा.
असे हे पात्र नवरा म्हणून ज्या स्त्रीला लाभते,ती नेहमीच आपल्या संसारात आनंदाने रमून जाते.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


