Home » Marathi » Poem » शरद पौर्णिमा

शरद पौर्णिमा

आश्विन मासी उगवला चंद्र पुनवेचा,
भारतीय संस्कृती नुसार हा दिवस आहे खुप महत्वाचा.

कोणी म्हणते शरद पौर्णिमा तर कोणी म्हणते कोजागिरी,
तर कुठे हिला संबोधले जाते माणिकेथारी (मोती तयार करणारी).

कोजागिरीचा अर्थच बघा किती खोल आहे,
‘कोण सजग आहे, ज्ञानासाठी आतुर आहे’ असे लक्ष्मी देवी विचारात आहे.

शरद ऋतूतील ही पौर्णिमा आहे सर्वांना वेध लावणारी.
प्राचीन, धार्मिक, खगोलिक, सांस्कृतिक अशा सर्वांचा सांगड घालणारी.

ही रात्र आहे चंद्र आणि पृथ्वी यांच्या जवळ येण्याची,
सोळा कलांनी परिपूर्ण अशा त्या चंद्राचे तेज डोळ्यात सामावुन घेण्याची.

सर्वांना शरद पौर्णिमेच्या शुभेच्छा.

डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *