स्मशान..
अरेरे..स्वतःची काय ही अवस्था करून ठेवली आहे माणसाने!!मरण असंही स्वस्त झालंच होत.पूर्वी निदान काही लोक तरी यायची अंत्ययात्रेला.मेलेल्या माणसाबद्दल चार चांगल्या गोष्टी बोलायचे,थोडी हळहळ व्यक्त करायचे,आता तेही बंद झालं आहे.इन मीन चार जण येतात आता अंत्यविधीसाठी. चला चार टाळकी येताना दिसताहेत..बघुया काय बोलत आहेत ते..अरे बापरे..ह्यांना तर काही सुख दुःखच नाही..डोळ्यात एक टिपूरपण नाही.काय म्हणताहेत…
