१५ ऑगस्ट १९४७ साली आपला भारत देश स्वतंत्र झाला, पण २६ जानेवारी १९५० साली संविधान स्वीकारून भारत देश एक लोकतांत्रिक, सार्वभौमिक आणि गणराज्य देश बनला. प्रजासत्ताक म्हणजेच प्रजेची सत्ता असलेला हा भारत देश..
“हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची, रामायणे घडावी,येथे पराक्रमाची शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे… ” या ओळींमध्ये भारताच्या भूगोल, इतिहास, परंपरा, संस्कृति,प्रगती, शौर्य या साऱ्यांचे दर्शन होते.
सर्व भारतीय नागरिकांना आणि जगाच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या पण मनाने भारतीय असलेल्या सर्वांना ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


